Flour Mill Yojana शासनाकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना
या राबवल्या जातात.त्यातच आता गरजू महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी मिळत आहे.म्हणजेच महिलांना शंभर टक्के अनुदान यावरती पिठाची गिरणी सरकारकडून देण्यात येत आहे.आणि यासाठी अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत.तर ही योजना काय आहे ते जाणून घेऊ.
Flour Mill Yojana मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार या योजनेचा लाभ हा घेण्यासाठी.
अर्ज कसा आणि कोठे करावा?
या योजनेत कोणत्या महिला अर्ज करू शकतात?
कागदपत्रे काय असतील?
आणि पात्रता काय असणार आहे?
या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर राबवण्यात येत आहे.या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच होणार आहे.ही योजना ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब महिलांसाठी राबवली जात आहे.या योजनेचा उद्देश्य फक्त खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देणे आणि महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न घेता येईल.
व ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.अशा महिलांना या योजनेतून लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे. कारण की पिठाची गिरणी पासून उत्पन्न हे चांगले मिळते. आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात.
मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया.
1) या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
2) गरीब आणि गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
3) या योजनेचा लाभ 18 ते साठ वयोगटातील मुली व महिलांना घेता येणार आहे.
4) अर्ज करणारी महिला किंवा मुलगी बारावी शिकलेली असावी.
5) अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे.
तर या प्रकारची पात्रता मध्ये बसणाऱ्या सर्व महिला किंवा मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया.
1) अर्जाचा विहित नमुना
2)शिक्षणासंबंधीत प्रमाणपत्र
3) व्यवसायासाठी जागेचा उतारा
3) उत्पन्नाचा दाखला( तहसीलदार किंवा तलाठी यांचा)
4) आधार कार्ड झेरॉक्स
5)बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
6)रहिवासी दाखला
7)आणि विज बिल
या योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा ते पाहूया.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागतो. विहित नमुना (prescribed pattern)हा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे.आणि त्याच्यासोबत सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ते जोडायचे आहेत.
हा अर्ज भरून झाल्याच्या नंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी(Group Development Officer) , पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे. आणि हा अर्ज जमा केल्या नंतर जेवढे अर्ज जमा होतील.
आणि या अर्जासोबत ज्यांची कागदपत्रे योग्य आणि बरोबर असतील, अशा महिला लाभार्थ्यांची निवड महिला व बालविकास समिती(Women and Child Development Committee) द्वारा केली जाईल.आणि लाभ मंजूर झाल्याचे लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.
तर अशाप्रकारे महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
Nuksan bharpai update महाराष्ट् शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून